Share

“नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल(३० जाने.)जेईएस कॉलेजच्या गांधी स्टडी सेंटरने आयोजित केलेल्या ‘कर के देखो’ या कार्यक्रमात बोलत असतांना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी(Tushar Gandhi) यांनी वेदनादायी प्रतिक्रिया दिली. महात्मा गांधींच्या शिकवणीचे पालन करणार्‍यांची संख्या देशात कमी होत असून नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होत चालली आहे, असे तुषार म्हणाले.

यावेळी बोलत असतांना तुषार गांधी म्हणाले की, ‘महात्मा गांधींची शिकवण संपुष्टात येत असून मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा हाती घेतली जात आहे. परंतु काही लोकांचा वर्ग इतिहासाशी छेडछाड करीत असला तरी आपल्याला खरा इतिहास पुनरुज्जीवित करायचा आहे. तसेच धर्म, जात, प्रदेश या आधारावर आपण विभागलो असून आपली फूट ही आपली ओळख, मानसिकता आहे’, असे तुषार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राष्ट्र म्हणजे केवळ सीमा, ध्वज आणि नकाशा नसून राष्ट्र ही एक भूमी आहे ज्यावर सर्व मानव राहतात. लोकच राष्ट्र घडवतात.’ असेही तुषार गांधी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!