मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांत ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार १४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तर आज दिवसभरात १४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५३ हजार १८२ इतकी आहे.
दरम्यान आता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे.
पण आता कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता धुसर झाल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं यावर टिप्पणी करण्याचं टाळलं आहे. पण काही सदस्यांनी सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. तिसरी लाट आलीच तर ती फार पसरणार नाही. असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती करणार अनोखे आंदोलन
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- ‘वीज नसल्याने लाखो रुपयांचा ऊस जळतोय’; सुळेंसमोर शेतकऱ्याने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- अजित पवारांवर मंत्री ठाकूर यांनी आरोप केल्यानंतर चंद्रकांत पाटलांच मोठं विधान !


