Share

“महाराष्ट्र काश्मिरी पंडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभा”, आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील. असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांची पोस्ट रिपोस्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंची हत्यासत्र कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी काश्मीरमध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

“शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या दिवंगत राहुल भट आणि दिवंगत रजनी बाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबांना आणि काश्मिरी पंडितांना सांगितले की, महाराष्ट्र काश्मिरी पंडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान कश्मीर मधील परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादच्या सभेत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यातच आता शिवसेना नेते प्रत्यक्ष काश्मीर मध्ये जाऊन तेथील कुटुंबियांना धीर देत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!