पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने करोना देशात पसरविला. या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर मागावी यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर “माफी मागो” आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.संसदेत सत्य बोलायचं असतं पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने या देशाच्या जनतेशी खोटं बोलण्याच काम करत आहे.आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संसदेत खोटं बोललं आहे.याचा निषेध आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
-
शिवजयंतीनिमित्त रॅली तसेच डी.जे वर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
-
“महागाई कमी करायची असेल तर भाजपला हरवा कारण जिंकली तर…”, अतुल लोंढेंचा इशारा
-
‘नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का’; दीपक केसरकरांचा सवाल
-
राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी देणार का पंजाब राजकारणाला नवीन वळण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
