Share

रणजी ट्रॉफी: सरफराज खानची शानदार १५० धावांची खेळी

Published On: 

मुंबई: मुंबईकडून रणजी खेळणाऱ्या सरफराज खानने पहिल्याच सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावले आहे. गेल्या रणजी हंगामात सरफराजने एक शतक, एक द्विशतक, एक त्रिशतक झळकावले होते. आता पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. मुंबईच्या संघाने अवघ्या ४४ धावांत तीन विकेट गमावल्या असताना सरफराजचे आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी उतरले. सर्फराजने रहाणेसोबत २०० हून अधिक धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.

सरफराज खानने २९९ चेंडूंत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५० धावा केल्या. एवढेच नाही तर कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या अजिंक्य रहाणेनेही पुनरागमन करताना शतक झळकावले. रहाणेनेही सलामी देत २५० चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या.

रणजीच्या गेल्या हंगामात सरफराजने पहिल्या सामन्यात ८ आणि ७१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ ३६ धावा आल्या. मात्र त्यानंतर त्याने नाबाद ३०१ धावांची खेळी केली. सरफराज एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढच्या सामन्यात नाबाद २२६ धावा केल्या. त्यानंतर ७८ आणि २५ धावांच्या खेळीनंतर त्याने १७७ धावा केल्या. आता सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावून सरफराजने प्रथम श्रेणीतील आपला विक्रम नेहमीच भक्कम ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!