🕒 1 min read
मुंबई : सन २००५, २०१९ आणि आताचा महापूर याची उच्चतम पातळी निश्चित केली जाईल. पुराचा धोका टाळण्यासाठी त्यापेक्षा उंच पातळीवर बांधकाम करून राहायला जावे लागेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे मंगळवारी व्यक्त केले. त्याच बरोबर नदीच्या अवती भवती भींत बंधू असे देखील सांगितले.
त्यावर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. भातखळकर म्हणतात, ‘प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला, आरामचंद्र भिंत बांधतायत’ अशा खोचक शब्दात भातखळकरांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून असे वक्तव्य केले आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहे. काहीजण भातखळकरांचा विरोध करत आहे तर कुणी समर्थन.
प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला…
आरामचंद्र भिंत बांधतायत…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2021
पुरापर्स्थितीवर अनेक राजकीय नेते मदत देखील करत आहे. घटना स्थळांना भेट देऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे मनोबल वाढवत आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना देखील मदतीत करत आहेत. पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राने देखील ७०१ कोटींचा निधी दिला आहे. २००५ नंतर हा पूर जास्त नुकसान दायक होता असे नागरिक म्हणत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १४ जिल्ह्यांत निर्बंध होऊ शकतात शिथिल, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- गुजरात कॅडरचे IPS अधिकारी राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस कमिशनर
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
