नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 21 दिवसांकरता हा लॉकडाऊन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना व्हायरसबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले. तसंच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, “आज रात्री 12 वाजल्यापासून पूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होत आहे. भारताला वाचवण्यासाठी, भारताच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून घरातून बाहेर निघण्यावर बंदी आहे. देशातील प्रत्येक राज्याला, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला, जिल्हा, गाव, गल्ली प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे.”
दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका असं मोदींनी म्हटलं आहे.
सर्व प्रगत देशांमध्ये आव्हान वाढत चाललं आहे. त्यामुळे आपण सतर्कता बाळगायला हवी, असं ते म्हणाले.दरम्यान, संपूर्ण देशामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एकप्रकारे हा कर्फ्यूच असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं,
आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. अशी बेपर्वाई सुरू ठेवली तर मोठे संकट येईल असा इशारा मोदी यांनी दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

