🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर विविध भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘हे पत्र हातात पेपर न घेता मुख्यमंत्री ठाकरे वा उपमुख्यमंत्री अजित पवार वयानी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला समजून सांगावं, असं आव्हानच भाजप नेते निलेश राणे यांनी दिलं आहे.
हातात पेपर न घेता मुख्यमंत्री किव्हा उपमुख्यमंत्री दोंघान पैकी एकानी तरी हे PM साहेबांना पाठवलेलं पत्र महाराष्ट्राच्या जनतेला फेसबुक लाईव्हवर समजून सांगावं. सरळ सरळ दिसतंय हे पत्र अधिकाऱ्यांनी बनवलं आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरे असं पत्र स्वतः बनवतील त्या दिवशी संज्या लीलावतीत. pic.twitter.com/zBCeyxgSme
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 15, 2021
‘हातात पेपर न घेता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दोंघान पैकी एकानी तरी हे PM साहेबांना पाठवलेलं पत्र महाराष्ट्राच्या जनतेला फेसबुक लाईव्हवर समजून सांगावं. सरळ सरळ दिसतंय हे पत्र अधिकाऱ्यांनी बनवलं आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरे असं पत्र स्वतः बनवतील त्या दिवशी संज्या लीलावतीत,’ असा प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण भटकणार्यांना परभणी पोलिसांनी दाखवला हिसका
- कोरोना झालेल्या पतीच्या निधनानंतर पत्नीची चिमुकल्यासह तलावात उडी घेत आत्महत्या
- पुण्यात कोरोनाचा हाहाकार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद !
- कोरोनाचा उद्रेक : ‘या’ जिल्ह्यात किराणा दुकानांसह भाजीपाला देखील राहणार बंद !
- उसनवारीच्या पैशातून धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला! पंधरा वर्षीय युवक ठार, दोघे गंभीर जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

