🕒 1 min read
मुंबई: राज्यावर नैसर्गिक आपत्ती बळावली आहे. या आपत्तीत विरोधी पक्षाकडून सेनेवर सतत वार केले जात आहेत. कधी मदतीवरून तर कधी दौऱ्यावरून या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून सडकून उत्तर दिले आहे. २७ जुलैच्या सामना अग्रलेखात त्यांनी विरोधी पक्ष्याच्या राजकीय दौऱ्यांना ‘पर्यटन’ ची उपमा देत चांगलेच धारेवर धरले. त्यावरच आता भाजपचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे.
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते.लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवय असलेल्यांनाच तळी उचलू द्या, असा टोला लगावत आम्ही लोकांची सेवा करू असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
दरम्यान संजय राऊत यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेला संताप यावरही सामन्यात भाष्य केले आहे. ज्यांनी निसर्गकोपात सर्वस्व गमावले त्यांच्या संतापाचा स्फोट झालाच तर राज्यकर्त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. त्यामुळे अशा वेळी संयम आणि समन्वय ठेवणे गरजेचे असून विरोधी पक्षाने मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये असा सुतोवाच दिला आहे. यावरच नारायण राणे यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत प्रतिउत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
