Share

होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी; भातखळकरांचे जयंत पाटलांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठा विजय मिळवला. त्या निकालाचा दाखला देत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. ‘देगलूरमध्ये आज निकाल लागला. तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांचे आव्हान स्वीकारले आहे.

पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल’, असे जयंत पाटील म्हणतात. चला, स्वीकारले आव्हान. होऊन जाऊ दे… दूध का दूध और पानी का पानी असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांचं विधान पाहता त्यांना सत्ता मिळवण्याची घाई झाली आहे. त्यासाठी सगळी धडपड चालली आहे. त्यातूनच धाडी आणि अटकसत्र चालवलं आहे. पण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, असे सांगत भाजपने भानावर यावं आणि समर्थ व स्वच्छ विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असं आवाहनही जयंत पाटील यांनी केले होते. त्यावरच भातखळकर यांनी पाटलांचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!