मुंबई: एमआयएम ने दिलेल्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ही आघाडीची ऑफर म्हणजे “एक राजकीय षडयंत्रं होतं. आम्हाला बदनाम करण्याचं ते एक जलील षडयंत्र होतं. आमच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचं षडयंत्र होतं. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच अशाप्रकारची कोणतीही आघाडी होणार नाही. भविष्यातही अशा प्रकारचं अलायन्स होणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत एमआयएमला सामिल करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करताना जलील यांनी हा प्रस्ताव ठेवला. त्यावरून आघाडीत गदारोळ उडाला आहे. आघाडीच्या सर्वच नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शिवसेनेनेही एमआयएमला आघाडीत घेण्यास तीव्र विरोध केला होता.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
