🕒 1 min read
लातूर: जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाला गती देणार असून शहराबाहेरून जाणाऱ्या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम आशियाई बँक निधीतून करण्यात येणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. अशोक चव्हाण आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच सुधारणांसाठी पुरेसा निधी मिळावा, मागील कामांची थकित देयके देण्यात यावीत तसेच लातूर शहरातून जाणाऱ्या लातूर-नांदेड महामार्गावर शहरात उड्डाणपूल उभारावा, टेंभूर्णी ते लातूर मार्गाची रुंदीकरण करण्यात यावे ,लातूर शहराभोवतीच्या रस्ते मुख्य मार्गाशी जोडणे, लातूर शहराच्या बाजूने रिंगरोड तयार करण्यासाठी निधी मिळणे, ग्रामीण लातूर व रेणापूर मतदारसंघातील रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करणे आदी विविध मागण्या अमित देशमुख यांनी केल्या.
लातूरचे पालकमंत्री @AmitV_Deshmukh यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत लातूर शहराचा नवीन रिंगरोड आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच लातूरच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या कामांबाबतही विस्तृत विचारविनिमय झाला. pic.twitter.com/n4C5Y5zNPy
— Ashok Chavan (@AshokChavan1958) July 1, 2021
यावेळी लातूरसह मराठवाड्यातील रस्त्यांच्या कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच मागील थकित रक्कम देण्यासाठी प्रयत्न करू. लातूर-नांदेड महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यांच्याशी संपर्क साधून शहरातून जाणाऱ्या ७ किमी मार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाकडे पाठविण्यात येईल. पुण्याला जाणाऱ्या मार्गावर टेंभूर्णी ते लातूर ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही लवकरच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
दरम्यान, लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ६१ किमीच्या नवीन रिंगरोडच्या कामास मंजुरी देण्यात आली असून ५० किमीचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित ११ किमीमध्ये रस्ता अस्तित्वात आहे. या रिंगरोडचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून तो करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महागाईचा आजार, जनता बेजार…सुखाने आहे फक्त मोदी सरकार’
- राजकीय गोटात खळबळ : आघाडीत बिघाडी ? शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये गुप्त बैठक
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

