🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेमुळे लोकांची गर्दी होत कोरोनाचे नियम धाब्यावर बसल्याचे दिसत आहे. यावरुन महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहेत.
त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन केले आहे. तर काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला सल्ला दिला होता.
केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारीने वागून एक चांगला आदर्श ठेवायला पाहिजे. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. भाजपने गर्दी टाळायला हवी, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.भाजपने राजकीय मतभेद विसरुन कोरोना विरुद्ध आपण सगळे असं हे युद्ध असताना आपण गर्दीच्या जागा टाळाव्या. कोरोनाचे नियम आपण सर्वांनीच पाळायला हवेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला अगोदर प्राधान्य- रावसाहेब दानवे
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
