इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर 26 धावांच्या आत टीम इंडियाने तीन गडी गमावले.
रोहित, शुबमन आणि चेतेश्वर पुजारा यांना लवकर बाद केल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. भारतीय संघाच्या तीन विकेट 88 धावांवर घेतल्या होत्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पुढाकार घेतला. कोहली आणि रहाणेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोहलीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक 41 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. विराटच्या नावावरही एवढीच शतकं आहेत. त्यामुळे या सामन्यात शतक केलं तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या
- काल झालेल्या सामन्यात थोडक्यात बचावला पुजारा
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
