मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये भाजपकडून किरीट सोमय्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमरावतीत किरीट सोमय्या हे कोणाचा भांडाफोड करणार याबाबत सध्या उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या हिंसाचाराचा देखील ते आढावा घेणार आहेत.
किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास सरकारमधील अनेक नेते-मंत्र्यांवर लक्ष केले आहे. त्यांच्यावरील आरोपानंतर अनेकांना ईडीचा सामना करावा लागला आहे. यावेळी माध्यमांशी बोलकताना किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतेच, पण उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे हे 1992-93च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचारल म्हणता. हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा ते घोटाळा उघडकीस आणणार आहेत, असा दावा करण्यात येत आहे. तर या संदर्भात दुपारी 12 वाजता किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होणार असून ते या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ‘हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं’
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा


