Share

‘हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं’

Published On: 

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेतली होती. त्यांच्या या शपथविधीची जोरदार चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आता या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष झाल्याच्या निमित्ताने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मी एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार आहे. राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नाही, अशी टीकाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!