Share

राज्यातील जनतेला वास्तव कळावे म्हणून किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सोमय्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले होते. तर आज किरीट सोमय्या थेट कोर्लई गावात जाणार (Kirit Somaiya will visit Korlai village today) आहे.

दरम्यान कोर्लई गावात किरीट सोमय्या यांना विरोध केला जात असून आता पुन्हा एकदा शिवसैनिक आणि सोमय्या आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेला वास्तव कळावे, म्हणून किरीट सोमय्या कोर्लई गावात जाण्यासाठी निघाले आहेत.

तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी कोर्लई गावात १९ बंगले बांधले. असे असले तर आपण सर्व पत्रकार तिथे पिकनिकला जाउत. आणि बघुत खरच तिथे बंगले आहेत का? आणि जर तिथे बंगले असतील तर मी राजकारण सोडेल, अन्यथा शिवसेना किरीट सोमय्या यांना जोड्याने मारेल. असा मोठा दावा केला होता. आता आज सोमय्या कोर्लई गावात पोहचतात, की त्यापूर्वीच नवे वादंग उभे ठाकते हे लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!