Share

“…मात्र ठाकरे सरकारची ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती”, ‘त्या’ निर्णयावरून केशव उपाध्ये यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मध्य प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सव्वा दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट करा सांगितले होते. मात्र ठाकरे सरकारची ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नुसत्याच गप्पा मारत होते. मध्य प्रदेशाने मात्र ट्रीपल टेस्ट पूर्ण करतबाजी मारली.”, असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षणा संदर्भात ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने  स्पष्ट केले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. तर इकडे महाराष्ट्रातही यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!