मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहे. यावरुन सध्या एकच खळबळ उडाली आहे. यातच आता नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आर्यन खान जामीन प्रकरणी नवाब मलिक म्हणाले की, “कुख्यात गुन्हेगार असतील, दहशतवादी असतील तर त्यांना तुरुंगात ठेवलंच पाहिजे. पण जामीन लोकांचा अधिकार असतो, ही पळून जाणारी लोक नाहीत. कधीही कुठल्याही तपासामध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा ते हजर होवू शकतात. अशा लोकांना तुरूंगात ठेवून केवळ पब्लिसिटी करून घेणं हा उद्योग समीर दाऊद वानखेडेचा सुरू होता. यापुढे बऱ्याच केसेस आहेत, ज्या समीर वानखेडेने तयार केलेल्या आहेत. त्या कशा बोगस आहेत, याचे पुरावे आम्ही सगळे शोधून काढलेले आहेत.” असं नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, मलिकांनी ‘क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता. त्या रेव्ह पार्टीमध्ये फॅशन टिव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता त्यामुळे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही?, याची उत्तरं समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहेत’, असे म्हणत मलिक यांनी समीर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच काशिफने देखील यावर प्रतिक्रिया देत नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

