पुणे : त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला आहे. महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचाच पुढचा टप्पा आज अमरावतीमध्ये पहायाला मिळाला. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.
त्रिपुरामध्ये घटना घडली. त्यामुळे मालेगाव, अमरावती, नांदेड येथे जातीय दंगली उसळल्या आहेत. काही समाजकंटकांनी काहींनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या परंपरेनुसार जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं अजित पवार यांनी आवाहन केलं आहे.
दरम्यान, त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
महत्वाच्या बातम्या
- ‘1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता’
- ‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’
- फडणवीसांचं ‘ते’ कृत्य म्हणजे देशद्रोह, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा- नाना पटोले
- मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर
- राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

