Share

‘1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता’

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला आहे. महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याचाच पुढचा टप्पा आज अमरावतीमध्ये पहायाला मिळाला. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दंगलीवरून थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

1993 च्या दंगलीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता राहिला. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतं. काही झालं की भाजपचा हात आहे असं बोललं जातं. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती. ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, पण आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करू नये असे आवाहन केले. आपणही तेच आवाहन करत आहोत. कर्मचाऱ्यांना आत्मदहन हा पर्याय नाही. या आंदोलनातून मार्ग निघेल, असा आशावादही चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!