Share

सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड मोडल्यानंतर कपिल देवने अश्विनला पत्र पाठवले; ज्यात लिहले…

Published On: 

मुंबई: नुकतीच संपलेली भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी अतिशय संस्मरणीय ठरली आहे. मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात अश्विनने टीम इंडियाचा दिग्गज कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ विकेट घेण्याचा विक्रम मोडला. मोहाली कसोटी सामन्यात अश्विनने ६ विकेट घेतल्या होत्या. तो कपिल देवला मागे टाकत कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा फलंदाज बनला. अश्विनने नुकतेच सांगितले की कपिल देवने त्याला यानंतर पात्र पाठवले होते.

कपिल देव (kapil dev) हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू मानले जातात. भारताचा पहिला विश्वचषक जिंकून अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विनला (ravi ashwin)  स्वतःचा विक्रम मोडल्याबद्दल विशेष पुष्पगुच्छ आणि हाताने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. आता अश्विनने सांगितले की कपिल देव यांनी पत्रात लिहले होते की, “अभिनंदन, मला खूप आनंद झाला की तु माझा विक्रम मोडला. तु भारताला गौरवांकित केले आहे. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा देतो.”

रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी फॉर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे अनिल कुंबळे आहे, ज्याच्या नावावर ६१९ विकेट्स आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने एकूण १२ बळी घेतले. त्याच्याकडे आता एकूण ४४२ कसोटी विकेट्स आहेत. अश्विनला अनिल कुंबळेचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्यात अश्विन यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!