Share

‘सत्तर वर्षात जे कमावले, ते काही वर्षात गमावले; रवांडा, नेपाळ सारख्या देशांकडून मदत घ्यायची वेळ आली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून केंद्र सरकारला झापलं आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश धावले आहेत. अनेक देशांमधून आरोग्य साहित्य भारताला मिळत आहे.

यावरूनच राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘जगातल्या प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्राने लाज काढली. रवांडा, नेपाळ आणि भूतान सारख्या देशांकडून मदत घ्यायची पाळी आली सत्तर वर्षात जे कमावले ते काही वर्षात गमावले,’ असा प्रहार आव्हाड यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!