Share

शाळेचा ड्रेस कोड पाळलाच पाहिजे परंतु, हिजाब प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : कर्नाटक राज्यातील उडपी येथे काही शाळेत शिकणाऱ्या मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू पाहत होत्या,परंतु उडपी मधील त्या शाळेच्या प्राचार्यांनी त्या मुलींना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू दिला नव्हता.

यावरून देशभर मोठ्या प्रमाणात वादंग उठला आहे. ज्या मुस्लिम मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू इच्छित होत्या त्यांना प्रतिक्रिया म्हणून कित्येक हिंदू मुला मुलींनी अंगावर भगवी शाल परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला होता आणि आंदोलन पण केले होते. या हिंदू मुस्लिम शालेय,महाविद्यालयीन तरुणांच्या  वादावर देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी आणि लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यातच आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, ” प्रत्येकाने कोणता वेश परिधान करायचा याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. याबाबत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कोणाकडूनही  हिरावून घेतला जाऊ शकत नाही. शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण जे पूर्वीपासून चालू आहे त्यामध्ये व्यत्यय आणून वेगळी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या कर्नाटकात होत आहे. त्या शाळेत पूर्वी ते चालू होते पण ते आता थांबण्यासाठी मुद्दाम हा विषय तयार करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारच्या अपयशांकडून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न आहे असेही ते प्रतिक्रिया देताना म्हणाले.

    महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!