पुणे : अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना गृहमंत्री पद घ्या असं मी म्हणालो होतो. पण ते म्हणाले नको गृह विभागामुळं माझा बीपी वाढतो. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांकडे ते खातं गेलं. पण तुमचं तसं होऊ नये उलट तुमच्या सर्व व्याधी या गृह विभागामुळं जावोत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.
अर्थात हे म्हणताना त्यांचा सूर मिश्किलपणाचा होता, म्हणूनच त्यांनी पत्रकारांना हे ऑफ दि रेकॉर्ड आहे असं सूचित केलं. नाहीतर तुम्ही ब्रेकिंग न्यूज कराल आणि जयंतराव म्हणतील अजित तू काहीही सांगत बसतो, असं म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं’, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.
मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही… ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंत राव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा, असंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना कसा घालवायचा यावर मुख्यमंत्र्यांनी WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे- चित्रा वाघ
- मुख्यमंत्री, ड्रग्ज पेडलरची वकिली करणाऱ्या नवाब मलिकांचं तुम्ही समर्थन करता; भातखळकरांचा गंभीर आरोप
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- ‘१० तोंडं काय अन् ३ तोंडं काय.. रावण तो रावण!’; ठाकरे सरकारला चित्रा वाघ यांची रावणाची उपमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

