मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक टीकांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्यावरुन भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले.
कोरोना कसा घालवायचा यावर राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भरगच्च षणमुखानंद सभागृहातून WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे, असा टोला चित्र वाघ यांनी लगावला आहे.
#कोरोना कसा घालवायचा यावर राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भरगच्च षण्मुखानंद सभागृहातून #WHO ला मार्गदर्शन केलंय म्हणे..!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2021
१० तोंडं काय अन् ३ तोंडं काय.. रावण तो रावण! महिलांवर अत्याचार करणाऱ्या रावणासारख्या अपप्रवृत्तीचं दहन करायलांच हवं. त्यासाठी प्रत्यक्ष प्रभू राम तर अवतरणार नाहीत पण रामरूपी जनताच रावणाची सत्ता उलथवून ख-या अर्थानं सीमोल्लंघन करेल, असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला रावणाची उपमा दिली होती.
दरम्यान,विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री, ड्रग्ज पेडलरची वकिली करणाऱ्या नवाब मलिकांचं तुम्ही समर्थन करता; भातखळकरांचा गंभीर आरोप
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

