Share

Jayant Patil | “देवेंद्र फडणवीसांना हे सरकार चालवण्यात रस नाही”; जयंत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्याच्या सरकारमध्ये फार रस नाही”, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे.भाजपने तब्बल 9 राज्यातील सरकार पाडली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजप आणि राज्यातील सरकारबाबत अस्था राहीलेली नाही, असंही जयत्न पाटील म्हणालेत.

यावेळी बोलताना त्यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबतचे वादग्रस्त विधान, तसेच कालचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे फडणवीसांना मान्य आहेत का? हे त्यांना विचारले पाहीजे, हे त्यांना मान्य असू शकत नाही”,असं मत जयंत पाटलांनी मांडलं.

पुढे ते म्हणाले, वेदांतासाठी आपण गुजरात पेक्षा जास्त सवलती दिल्या होत्या. मात्र, तरी देखील प्रकल्प गेला. दु:ख हे आहे की जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र, प्रकल्प तिकडे गेल्यामुळे आपल्या राज्याला मोठा फटका बसल्याचं जयत्न पाटील यावेळी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या