🕒 1 min read
Girish Mahajan | नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे सेशन कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळाला. जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा (Case Regester Against Jitendra Awhad) दाखल केला होता. रिदा रशिद असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे. आव्हाडांच्या जामीनानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण सुर्या एवढ स्वच्छ आहे.” आव्हाडांनी आधीच्या लोकांना केलेली मारहान हे काय आहे?, आणि त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला?, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला. लोकांनी पाहीले आहे की, तुम्ही महिलेला दोन्ही हात धरुन कसं ढकलला आहे ते. त्यामुळे आव्हाडांवरील कारवाई ही नियमानुसार झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर गिरीश महाजनांनी भाष्य केलं. “आधीच्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात नारायण राणे, मला, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना महाजनांनी एकनाथ खडसेंवरही टीका केलीय. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सर्व पदे घरात पाहीजे. त्यांचे संपुर्ण कुटुंब तूप आणि लोणी खात असल्याचं म्हणत त्यांनी खडसेंवर हल्लाबोल केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | लोकांसमोर सरकारची फसवेगिरी उघडी पाडा – जयंत पाटील
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती टिप्स वापरून चेहऱ्यावरील काळे डाग करा दूर
- Bawankule on Ajit Pawar | “…तर तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही” ; बावनकुळे अजित पवारांना असे का म्हणाले?
- Jitendra Awhad | जामीनानंतर आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सगळं ठरलेलं…”
- Health Tips | लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
