Share

आज हा आनंदाचा दिवस उजाडलाच; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी आणि गाडा मालक बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी मोठी आनंदाची आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. शर्यत सुरू व्हावी ही पुणे भागातील आणि राज्यभरातील शेतकरी बांधवांची भावना होती. या भावनांचा मान राखत महाविकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/1089395705143503/

दरम्यान,  राज्य सरकारमार्फत तज्ज्ञ वकीलांची टीम लावली आणि आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.खिलारसारख्या इतर प्रजातींचं संवर्धन व्हावं यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीदेखील जयंत पाटलांनी दिली आहे. ‘पुनश्च बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!