नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आज ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. असे भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेले तीन कृषि कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक वर्षभर आंदोलन करावे लागले. त्यानंतर ते कायदे मागे घेण्यात आले. मात्र दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
सरकार द्वारा किसानों से वादाखिलाफी के खिलाफ कल 31 जनवरी को देशव्यापी "विश्वासघात दिवस" मनाया जाएगा ।
सरकार के 9 दिसंबर के जिस पत्र के आधार पर आन्दोलन स्थगित किया गया था, सरकार ने उनमें से कोई वादा पूरा नहीं किया है .!#FarmersProtest #विश्वासघात_दिवस pic.twitter.com/dBAlfXCGUI
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) January 30, 2022
राकेश टिकैत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. टिकैत म्हणतात, ‘ केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केल्याने आजचा ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने ९ जानेवारी रोजी दिलेल्या पत्रावरुन आंदोलन स्थगित करण्यात आले होते, त्यातील एकही वचन सरकारने पूर्ण केले नाही.’, असे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे.
भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले होते. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी २०२० मधील नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले होते. यात तीन कृषी कायदे मागे घेण्यासह शेतमालाला एमएसपी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने एमएसपी लागू करण्याचे वचन दिले होते. मात्र पूर्ण केले नाही, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
“देश लुटणाऱ्यांवर पेगॅससची निगराणी नाही, पण देशहितासाठी बोलणारे मोदींच्या अस्त्राचे शिकार झाले”
देशातील नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना शत्रूसारखे वागवायचे ही कोणती रीत?- संजय राऊत
“मुंबईत २५ वर्ष सत्ता असुनही शिवसेनेने रस्ते बांधले नाही, आता निवडणुकीसाठी…”
“…तर वाईन विक्रीचा निर्णय शेअरच्या किमती वाढवायला घेतलाय?”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

