🕒 1 min read
जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीर मधील विशेष कलम ३७० रद्द केला आणि राज्याला जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. यावेळी मोदी सरकारने विविध मुद्द्यावर आश्वासनं दिले होते. परंतु यातील एक सुद्धा पूर्ण झाले नाहीत असे देशातील अनेक नेते मोदी सरकार वर टीका करताना दिसून येत आहेत.
यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सुद्धा मोदी सरकारवर या संदर्भात निशाना साधला. ते या वेळी म्हणाले जम्मू-काश्मीर कलम ३७० रद्द करण्यापूर्वी बरेच चांगले होते ,केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच बदल घडवून आणण्याची आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी काहीच घडलेले नाही असं मत आझाद यांनी मांडले.
We were told that scenario in J&K will change after abrogation of Art 370. Growth, hospitals, unemployment will be taken care of. But that has not happened at all. As a matter of fact, we were far better when it was being ruled by various CMs: Ghulam Nabi Azad, Congress pic.twitter.com/Kr7Okk369M
— ANI (@ANI) October 24, 2021
दरम्यान ३७० कलम रद्द केल्यानंतर अनेक बदल होतील असे आम्हाला सांगितले होते. परंतु प्रदेशात हॉस्पिटल आणि इतर पायाभूत सुविधा तसेच रोजगार निर्मिती केली जाईल पण यामधील काहीच झाले नाही. जेव्हा तिथं मुख्यमंत्र्यांचे शासन होते तेव्हा आमची परिस्थिती बरीच चांगली होती. जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचे परिणाम लोकांना जाणवत आहेत. ‘आम्ही हरलोय. एका राज्याचे दोन भाग झाल्याने आमचं खूप मोठं नुकसान झालंय. राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्यापासून आमचा मोठा पराभव झाला आहे’ अशी खंत गुलाम नबी आझाद यांनी माध्यमासोबत बोलताना व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- ‘घोटाळे उघडकीस आणून तुम्ही राष्ट्रावर उपकार केलेत’, राऊतांकडून सोमय्यांचे कौतूक!
- आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर ‘भाजप’चा झेंडा फडकवणार; कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

