🕒 1 min read
औरंगाबाद : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवर गावाचा विकास करायचा असेल तर भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ बूथ अभियानाअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील अंधारी, घाटनांद्रा, उंडणगाव, अजिंठा, शिवना जिल्हापरिषद गटातील बूथ रचना, शक्तिप्रमुख, बुथप्रमुख, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करून आढावा घेण्यात आला.
जर गावातील स्थानिक विकासकामांना चालना द्यायची असेल तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण ताकदीने विजय मिळवू असा निर्धार जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. जिल्ह्यातील ६२ जिल्हा परिषद सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम अंत्यत जोमाने चालू आहे. जिल्हा परिषदेतील एका सदस्यामुळे भाजपाच्या ताब्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पद आले नाही.
याच कारणामुळे सिल्लोड -सोयगाव तालुक्यात विकास कामांच्या निधींना मुकावे लागले. त्यामुळे आवश्यक असलेली विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे प्रत्येक सदस्य पूर्ण ताकदीने निवडून आणा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी? भाजप नेते राम कदम म्हणतात…
- जम्मूच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचे युग आता संपले आहे – अमित शाह


