🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 14 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या सहा बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
दरम्यान, आज माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्यासह खा. राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधी पक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ आज शेतकरी आंदोलन प्रश्नी राष्ट्रपतींच्या भेटीला गेलं होतं.
यानंतर, या सर्व नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे. कृषी विधेयकावर चर्चा करण्यासाठी ते सिलेक्ट कमिटीकडे पाठवायला हवे होते. पण दुर्देवाने ही विधेयकं घाईत मंजूर करण्यात आली,’ अशी टीका देखील शरद पवार यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- आमचा आवाज दाबू देणार नाही; बंदीनंतरही शिर्डीत प्रवेश करण्यावर तृप्ती देसाई ठाम!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- अखेर सरनाईक पिता-पुत्र ईडीसमोर हजर होणार!
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- मराठा आरक्षण : ‘कोर्टाच्या थपडा खाऊन ठाकरे सरकारचे तोंड सुजले आहे’


