🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे.
मालिकेपूर्वी दोन्ही संघ आपापली रणनीती आखत असणार हे निश्चितच आहे. मात्र अशातच इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याची प्रतिक्रिया समोर येत असून त्याच्या मते जसप्रीत बुमराहविरुद्ध रणनीती आखणे अवघड आहे.
बर्न्स म्हणाला, “बुमराह हा एक असा खेळाडू आहे ज्याच्या विरुद्ध रणनीती आखणे अवघड जाते. तो गोलंदाजी करताना इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा जाणवतो. मी भारत आणि ऑस्ट्रेलियाची मागील मालिका बघितली होती, ज्यात संपूर्ण भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. भारताची बेस्ट प्लेइंग इलेव्हन नसूनदेखील त्यांनी विजय मिळवला होता. भारतात खेळणे निश्चितच वेगळे असणार आहे व मी या दौऱ्याची वाट बघत आहे.”
इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.
इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘नको रे बाबा’, बायोबबल आणि विलगीकरणाला कंटाळले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
- आयपीएल पुन्हा अमिरातीत होण्याची शक्यता
- आज पासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधीपक्षांकडून बहिष्कार !
- उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७४ कोटी रुपये निधीची तरतूद
- प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

