मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती.
दरम्यान आता यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ‘हे ठाकरे सरकार आहे की कोडगे सरकार? किती थपडा खाणार? ऐच्छिक, पण ११ वी प्रवेशासाठी आवश्यक. फक्त SSc बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित अशी ही ११ वी प्रवेशाची विचित्र सीईटी होती, अखेर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली.’ अशी टीका ट्वीटरच्या माध्यमातून भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
हे ठाकरे सरकार आहे की कोडगे सरकार? किती थपडा खाणार?
ऐच्छिक, पण ११ वी प्रवेशासाठी आवश्यक. फक्त SSc बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित अशी ही ११ वी प्रवेशाची विचित्र सीईटी होती, अखेर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली.https://t.co/kCA3yEmByt
via @mataonline: https://t.co/2vRlVYW2vH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 10, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- वैजापूर बाजार समितीच्या ‘या’ निर्णयासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र; वादग्रस्त जागेचा व्यवहार अखेर रद्द!
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार


