पुणे – पुणे शहरातील प्रामुख्याने कोंढवा, वानवडी, हडपसर आणि इतर अनेक भागांमध्ये शालेय मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेंमध्ये भर पडली आहे. तर अशी कोणतीही टोळी शहरामध्ये कार्यरत नाही आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन परिमंडळ पाठच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मीडियाशी बोलताना केलं आहे.
पोलिस उपायुक्त नम्रता पाटील एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना म्हणाल्या, कोंढवा, वानवडी, हडपसर आणि इतर अनेक भागांमध्ये मुलं किडण्याप करण्याचे मेसेज सोशल मीडिया वर फिरत आहे. हे मेसेज चांगल्या हेतूने जरी शेअर केले असतील तरी अशा मेसेजमुळे पालक पॉनिक होतात. आम्ही सर्व शाळांमध्ये चौकशी केली आहे, अशी कुठलीही घटना या परिसरामध्ये घडली नाही. अशा अफवा पुण्यातच नाही तर मुंबई , पुणे, नाशिक आणि इतर शहरांमध्ये देखील पसरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मसेज-

यावर नम्रता पाटील म्हणाल्या की, अशा कोणत्याही अफवा पसरू नका, असा प्रकार जर खरचं घडला तर आम्ही त्यावर नक्की कारवाई करू. आपल्या मुलांना कुणा अनोळखी माणसासोबत बोलू नका, कुणी काही खायला दिला तर घेऊ नका एवढ्या बेसिक गोष्टी जरी पालकांनी आपल्या मुलांना शिकवल्या तर त्यांची मुलं सुरक्षित राहतील.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेले स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस
- Shrikant Shinde | मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याच्या आरोपांवर श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | “उरलेले दोन चारजण वाचवा, नाही तर…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- New Smartphone Launch | Tecno Pova Neo 5G ची लॉन्चिंग तारीख जाहीर, जाणून घ्या!
- NCP । श्रीकांत शिंदे बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट
- Rohit Pawar | “सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही”


