मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील 50 आमदार आणि12 खासदार आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्ण कोलमडुन गेला आहे. शिंदेंनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असं चित्र पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत आरोप, टीका करत असतात. अशातच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना बावनकुळे असंही म्हणाले, एक दिवस ते चारच लोक राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था होईल. त्यामुळे टीका करणं सोडा. त्याचबरोबर शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, असं म्हणत बावनकुळेंनी शिवसेना पक्षाच्या जन आक्रोश मोर्चावरही टीका केली आहे.
तसेच, शिवसेनेच्या गोरेगावमधील मेळाव्यात ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून त्यांची मोठी भाषण सुरू आहेत. भाषण करताना उद्धव ठाकरेंनी विचार करून बोललं पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यामुळे त्यांचं नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही”
- MNS । फक्त चार खासदार, तरी वाजवतात बाजा, पोरीपुरताच उरलाय, साडेतीन जिल्ह्याचा राजा; मनसेचा टोला
- Tanushree Dutta | गाडीचे ब्रेक फेल करून, विष पाजण्याचा प्रयत्न करून अन्…; तनुश्री दत्ता ने केला खळबळजनक खुलासा
- Shrikant Shinde | “बेकायदा खुर्चीवर बेकायदा माणूस बसला…” ; ‘त्या’ फोटोवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- Health Tips | लवंगाचे तेल दूर करते अनेक आरोग्याच्या समस्या,जाणून घ्या!


