Share

लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकारचा भोंगळ कारभारच जबाबदार ? सीरमच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला विलंब होऊन, कोरोना संसर्गाचा धोका अधिकबळावत असल्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनावर काँग्रेसने याआधीच टीकास्त्र सोडलं आहे, देशातील नागरिकांना प्राधान्य न देता इतर देशांमध्ये लस निर्यात केल्यानेच नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, आता सीरमच्या बड्या अधिकाऱ्यानेच केंद्र सरकारवर लसीकरणाच्या कार्यक्रमावरून गंभीर आरोप केले आहेत. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!