Share

IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सनं कसा दिला RCBला निरोप? विराटनं सांगितली पडद्यामागची गोष्ट!

Published On: 

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) माजी कर्णधार विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा एबी डिव्हिलियर्सने मला सांगितले की तो यापुढे आरसीबीसाठी खेळणार नाही, तेव्हा हे ऐकून मी खूप भावूक झालो, असे विराट म्हणाला.

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आरसीबीकडून खेळताना या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी अनेक सामने जिंकले. गेल्या वर्षी एबीने क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती जाहीर केली होती. डिव्हिलियर्सने वाढते वय हे निवृत्तीचे प्रमुख कारण सांगितले. डिव्हिलियर्सच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेकडून ११४ कसोटी, २२८ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले. त्याच वेळी, तो आयपीएलमध्ये १८४ सामन्यांमध्ये खेळला आहे.

विराट म्हणाला, ”मला अजूनही आठवते की तो जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याने मला एक वॉइस नोट पाठवली. आम्ही दुबईला वर्ल्डकप खेळण्यासाठी येत होतो आणि मला एक वॉइस नोट मिळाली. तेव्हा अनुष्का माझ्यासोबत होती. मी तिच्याकडे पाहिले आणि तिची प्रतिक्रिया होती “काय?” ती पुढे म्हणाली, प्लीज असे काही सांगू नकोस. ही खूप विचित्र भावना होती. मी खूप भावूक झालो. माझ्या सुख-दु:खात डिव्हिलियर्स माझ्या पाठीशी उभा राहिला.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!