मुंबई:आयपीएलच्या १५व्या हंगामातील १३ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक झाली तेव्हा ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने पडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र त्यांनी १७० पर्यंत मजल मारली. ज्याचा पाठलाग करताना आरसीबीने त्यांना ४ विकेट्सने पराभूत करत सामना जिंकला.
स्पर्धेतील पहिला सामना गमवल्यानंतर कुठे चूक झाली सांगताना संजू सॅमसॅन (Sanju samson) म्हणाला “मी एका क्षणाचा उल्लेख करू शकत नाही जिथे आम्ही सामना गमावला. नाणेफेक गमावल्यानंतर इतक्या संथ विकेटवर धावसंख्या जमवण्याचा हा एक चांगला प्रयत्न होता असे मला वाटले. डेथ ओव्हरमध्ये जोस आणि हेटमायर यांनी शानदार फलंदाजी केली. दव येत असल्याने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्याचाही चांगलाच प्रयत्न होता.”
जेव्हा संजू सॅमसनला मॅच प्रेझेंटेशनमध्ये विचारण्यात आले की त्याने दव पडल्यामुळे अंपायरला चेंडू बदलण्यास सांगितले होते का? यावर संजू म्हणाला,
“नाही, मी नाही केले, माझा माझ्या गोलंदाजांवर विश्वास होता. डीके (दिनेश कार्तिक) हा खूप अनुभव असलेला माणूस आहे. आम्हाला फक्त फील्ड सेट करण्यासाठी आमचा वेळ द्यावा लागेल. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत आणि आपण खूप काही शिकू शकतो.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…तर लोक नागडं करून मारतील…”, संजय राऊतांचा INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना इशारा
- सोमय्यांनी ‘विक्रांत’साठी जमवलेला पैसा गेला कुठे ?
- IPL 2022: शानदार विजयानंतर कर्णधार फाफने केले कार्तिकचे तोंड भरून कौतुक; म्हणाला ‘संघाला त्याची गरज…’
- “काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर आता INS विक्रांत फाईल पाहा”, राऊतांचा मोदी-शाहांवर निशाणा
- अंशुमन विचारेला एप्रिल फूल पडले महागात, ‘त्या’ पोस्ट वरून पत्नीला मागावी लागली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

