🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये स्पर्धेचा ६५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात काल १७ मे रोजी खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने ३ धावांनी विजय मिळवला. मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात जसप्रीत बुमराह फक्त एक विकेट घेऊ शकला असला तरी त्याने या एकमेव विकेटने इतिहास रचला आहे.
जसप्रीत बुमराह हा टी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड करून हा विक्रम रचला. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २२३ विकेट्स घेतल्या आहेत, तर जयदेव उनाडकट २०१ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Jasprit Bumrah is the first Indian quick to reach 250 T20 wickets ???? #IPL2022 pic.twitter.com/SkZrZYbN1U
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 18, 2022
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. स्पर्धेच्या ६५व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३ धावांनी हरवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईसाठी रोहित-इशानने चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधली फळी ढासळल्यानंतर टिम डेव्हिडने धुवांधार फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण १८व्या षटकात तो बाद झाला आणि मुंबईने सामना गमावला. हा मुंबईचा दहावा पराभव ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

