🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 मधील लीग टप्प्यातील १६ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना ६ विकेटने जिंकला. आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीतील हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना होता. ज्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या क्षणी बाजी मारली. अशा परिस्थितीत विजयानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने स्टार फिनिशर राहुलचे कौतुक केले आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (hardik pandya) पंजाब किंग्जविरुद्धच्या अतुलनीय विजयानंतर म्हणाला, “मला अशा प्रकारच्या चढ-उतारांनी धक्का बसला आहे. तेवतीयाला (rahul tewtia) सलाम. तिथे बाहेर जाऊन हिट अवघड होते आणि दबावाखाली ते करणे चांगले आहे. हा पंजाब किंग्जचा खेळ होता, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.”
सामन्यात शतक ४ धावांनी मुकलेल्या शुभमन गिलचे कौतुक करताना हार्दिक पंड्या असेही म्हणाला,“गिल सर्वांना सांगत होता की तो उभा आहे. त्या भागीदारीचे बरेच श्रेयही साईलाही जाते. त्याने आम्हाला खेळात ठेवले.” आयपीएल २०२२ मध्ये गुजरात हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. गुजरातने खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. त्यामुळे टायटन्स ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: ‘अप्रतिम ,अविश्वसनीय, अद्भुत’; GT vs PKBS सामन्यात घोंगावलं तेवतीया नावाचं वादळ!
- IPL 2022: शुबमन- हार्दिक- तेवतीयाच्या धडाकेबाज खेळीने पंजाबचे गोलंदाज परास्त; ६ विकेट्सने दणदणीत विजय!
- IPL 2022: लिविंगस्टोनची दमदार बॅटिंग आणि राशीद खानची फिरकी; गुजरात पुढे १९० धावांचे लक्ष्य!
- OBC राजकीय आरक्षण कायद्याला मराठा नेत्याचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
- “टोकाची भूमिका घेण्याची परिस्थितीच आत्महत्त्यांना जबाबदार”- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
