🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्स संघाने इतिहास रचला. पहिल्याच हंगामात खेळून गुजरातने अंतिम फेरीत धडक दिली. गुजरातने क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) पराभव केला. यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आनंदी दिसत होता. विजयावर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
हार्दिक म्हणाला, ”मी माझ्या आयुष्यातील गोष्टी संतुलित करायला सुरुवात केली आहे. गेली दोन वर्षे मी सतत प्रयत्न करत आहे. शेवटी माझे कुटुंब, माझा मुलगा, माझी पत्नी आणि माझा भाऊ यांचाही मोठा वाटा आहे. अशा प्रकारे त्याने मला आयुष्यात तटस्थ राहण्याची परवानगी दिली. मी घरी जाऊन कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यास उत्सुक आहे आणि त्यामुळे मी एक चांगला क्रिकेटर बनलो आहे. अजून फारसं जाणवलं नाही. मी पुन्हा तटस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व २३ खेळाडू भिन्न दर्जाचे आहेतय. मी मिलरलाही सांगत होतो, की तुमच्या आजूबाजूला चांगली माणसं असतील तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात. आमच्यासाठी ही कथा आहे. आपल्याकडे ज्या प्रकारची माणसं आहेत, त्यातच खरी माणसं आहेत. हे काहीतरी नेत्रदीपक आहे आणि म्हणूनच आम्ही फायनलमध्ये आहोत.”
#PapaPandya, we love you 3000 ???????? @hardikpandya7#SeasonOfFirsts #AavaDe #GTvRR #TATAIPL pic.twitter.com/gzLojlYuI3
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 25, 2022
पंड्या म्हणाला, ”हे खेळाचा आदर करण्याबद्दल आहे. राशिद संपूर्ण हंगामात आणि चमकदार खेळला आहे. आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल मला मिलरचा अभिमान आहे. संघाला जिथे माझी गरज आहे तिथे मी खेळतो, मी कुठे खेळतो अशी माझी मागणी नाही. अशा प्रकारे मला यश मिळाले. संघाकडून खेळून मला यश मिळाले आहे. मी कितीही चांगला किंवा वाईट दिसत असलो तरी काही फरक पडत नाही. आमच्याकडे फलंदाजीची फळी आहे.”
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान संजू सॅमसनच्या आक्रमक ४७ आणि जोस बटलरच्या ८८ धावांच्या जोरावर राजस्थानने गुजरातला १८९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातकडून डेव्हिड मिलरने फिनिशरच्या भूमिकेत खेळत गुजरातला ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला. मिलरला हार्दिकची अप्रतिम साथ लाभली. आता २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच घरच्या मैदानावर गुजरात संघ फायनल सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
