🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. पण या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता हा सामना साडेसात ऐवजी रात्री ८ वाजता सुरू होईल. टी-२० लीगच्या समारोप समारंभामुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. हा सोहळा सकाळी साडेसह वाजता सुरू होईल आणि ५० मिनिटे चालेल. यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी होणार आहेत. नाणेफेक सकाळी साडेसात वाजता होणार आहे.
गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघ प्रथमच स्पर्धेत उतरले आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, समारोपीय कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय, पुढील हंगामापासून साडेसात वाजता सुरू होणारे सामने पूर्वीप्रमाणे ८ वाजता आयोजित करण्याची तयारी मंडळाने केली आहे. २००८ ते २०१७ पर्यंत रात्रीचे सामने ८ वाजता खेळवले गेले. २०१८ नंतर पहिल्यांदाच समारोप सोहळा होणार आहे.
BREAKING: #IPL2022 final to start at 8PM IST, instead of 7:30PM.@vijaymirror has the details ????https://t.co/1zJDnh775Z
— Cricbuzz (@cricbuzz) May 19, 2022
आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून सुरू झाली. दहा संघांच्या समावेशामुळे यावेळी ६० ऐवजी एकूण ७५ सामने होत आहेत. साखळी फेरीतील ७० सामने महाराष्ट्रात ४ ठिकाणी होत आहेत. कोरोनामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीचा अंतिम सामना २२ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
