मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीही ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर येत्या एक ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत दहा रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शिवभोजन थाळीचीही संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश काल जारी करण्यात आला आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘१ ऑक्टोबर पासून म्हणे मोफत असलेली अदृश्य शिवभोजन थाळी १० रुपये मोजून घ्यावी लागणार आहे. शिवाय त्याची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. कुठे दिसली नाही कधी ही थाळी’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शिवभोजन थाळीला अदृश्य थाळी असे संबोधले आहे.
अदृश्य शिवथाळी आता १० रु.
१ ऑक्टोबर पासून म्हणे मोफत असलेली अदृश्य शिवभोजन थाळी १० रुपये मोजून घ्यावी लागणार आहे. शिवाय त्याची पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे.
कुठे दिसली नाही कधी ही थाळी… pic.twitter.com/8uQdL9SHoX— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 29, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहित आहे’
- काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या संपर्कात; चरणजीत सिंह चन्नी यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू


