🕒 1 min read
चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे चेन्नईच्या पिचनं पहिल्या दिवसापासून स्पिनर्सला मदत केली आहे. दुसऱ्या दिवशी तर या पिचवर भारताच्या पाच आणि इंग्लंडच्या 10 अशा एकूण 15 विकेट्स गेल्या. चेन्नईच्या पिचवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला. भारतीय खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठीच फायदेशीर असते, अशी टीका करणाऱ्यांना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खेळपट्टीवर टीका करण्याआधी आपल्या मानसिकतेत बदल करावा असा सल्ला देखील दिला आहे.
इंग्लंड संघाचा पूर्व कर्णधार माईकल वॉन याने खेळपट्टीबद्दल भाष्य करताना, चेपॉक मैदानातील खेळपट्टी पूर्णपणे तयार नसल्याचे म्हटले होते. यावर अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘जर तुम्ही खेळपट्टीबद्दल बोलत असाल तर मला नाही वाटत की कुठलाही चेंडू हेल्मेटला जाऊन धडकला आहे. चेंडू सामान्यरित्याच फिरत होता. आम्ही (दोन्ही संघ) एकाच खेळपट्टीवर खेळत आहोत आणि धावा सुद्धा करत आहोत. यामुळे मला नाही वाटत की कोणालाही या गोष्टीचा त्रास असेल.’
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर अक्षर पटेल म्हणाला, ‘जेव्हा आम्ही परदेशात खेळण्यासाठी जातो, तेव्हा आम्ही जलद गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीबद्दल कधीच तक्रार नाही केली की खेळपट्टीवर गवताचे प्रमाण अधिक आहे. मला तर वाटते लोकांना खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे, अशात तुम्हाला जास्त काही करायची आवश्यकता नाही आहे. जेव्हा तुम्ही चेंडू फेकणार तेव्हा थोडा जोर लावून फेकला तेव्हा चेंडू फिरेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- आयपीएल लिलावाआधीच ‘या’ टीमनं बदललं नाव!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
