Share

डब्ल्युटीसी फायनलमध्ये भारताच्या गोलंदाजी रणनिती विषयी इंशातने केला ‘हा’ खुलासा

Published On: 

मुंबई : क्रिकेट जगतात सगळीकडे उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना २ दिवसानंतर सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

डब्ल्युटीसी सामन्यात भारतीय संघाने केवळ एकच फिरकीपटुला संघात स्थान दिले. तर पाच वेगवान गोलंदाजाचा १५ सदस्यीय संघात समावेश केला आहे. यात भारताचा सध्याच्या घडीला सर्वात अनुभवी गोलंदाज इंशात शर्माचा समावेश आहे. यासामन्याच्या पार्श्वभूमिवर इशांतने भारतीय गोलंदाजीच्या रणनितीविषयी खुलासा केला आहे. चेंडुला लाळ लावली तर चेडुंला स्विंग मिळत असते. मात्र मागील वर्षभरापासुन कोरोना संसर्गामुळे चेंडुला लाळ लावण्यास आयसीसीने बंदी घातली आहे. पण इंग्लंडमधील वातारणाचा विचार करता चेंडुला लाळ न लावताही रिव्हर्स स्विंग करता येईल. संपुर्ण सामन्यात एखाद्या गोलंदाजाला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. असे इशांत म्हणाला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने हे वक्तव्य केले. यावेळी त्याने पुढे बोलताना त्याने भारतीय खेळपट्टीचा दाखला देताना म्हणाला की, ‘भारतीय खेळपट्टीवर चेंडु हा उशीरा स्विंग होत असतो. मात्र इंग्लंडमध्ये तसे नाही. जर चेंडुचा टप्पा पुढे ठेवला तर येथील खेळपट्टीवर नियमीत स्विंग मिळु शकतो.’ कसोटी सामन्यात इशांत शर्मा हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे ज्याने १०० कसोटी सामने खेळलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!