Share

‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्यमध्ये इन्फोसिसबाबत धक्कादायक विधान करण्यात आले आहे. ‘साख और आघात’ या मथळ्याखाली पांचजन्यने चार पानी कव्हर स्टोरी छापली असून ही भारतातील अग्रगण्य आयटी कंपनी संबंधित लिहिण्यात आली आहे. इन्फोसिस राष्ट्रविरोधी शक्तींसोबत आहे. इन्फोसिस नक्षल, वामपंथी आणि तुकडे-तुकडे गॅंगला मदत करते, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, यामुळे एकच खळबळ उडाली असताना संघाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. RSS चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘एक भारतीय कंपनी म्हणून, इन्फोसिसने देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इन्फोसिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोर्टलमध्ये काही समस्या असू शकतात, परंतु पाचजन्य यांनी या संदर्भात प्रकाशित केलेला लेख केवळ लेखकाचे वैयक्तिक मत प्रतिबिंबित करतो,’ असं आंबेकर यांनी म्हटलं आहे.

यासोबतच, ‘पाचजन्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र नाही आणि त्यात नमूद केलेला लेख किंवा मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली जाऊ नयेत,’ असं देखील सुनील आंबेकर यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी सरकारने एक ई-फाइलिंग पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल इन्फोसिस ने तयार केलं असून या पोर्टलचा उपायोग करताना लोकांना वारंवार अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळेच वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील इन्फोसिसकडे नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!