सातारा – राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा नवीन विषाणू घातक आहे, कोणतीही लक्षणे दिसत नसताना अनेकांना तो बाधित करत आहे. त्यामुळे कोरोना रोखणे हे राज्य शासनाचे मुख्य ध्येय आहे. प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली असून, विनाकारण फिरणाऱ्या लोकांचा तातडीने बंदोबस्त करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस प्रशासनाला दिल्या.
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्य़ांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. विनाकारण बाहेर फिरणाऱयांना आधी सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा, अशी सूचना त्यांनी केली.
दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- संचारबंदीचा नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

