टीम महाराष्ट्र देशा : आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात तडाखेबंद खेळाडू हार्दिक पंड्याची सांगत वापसी झाली आहे. तसेच विराट कोहलीच टीम इंडियाचे नेतृत्व करणार असून जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा विश्तंती देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्यावर फलंदाजीची धुरा असणार आहे. तसेच हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू संघात आहे. त्याचबरोबर राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. तर रिषभ पंत यष्टीरक्षक असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला ट्वेन्टी-20 सामना १५ सप्टेंबरला धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. यात दुसरा सामना १८ तारखेला मोहालीत खेळवला जाईल तसेच तिसरा सामना बंगळुरूमध्ये २२ तारखेला खेळवला जाणार आहे.
India’s squad for 3 T20Is against South Africa: Virat(Capt), Rohit (vc), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Krunal Pandya, Washington Sundar, Rahul Chahar, Khaleel Ahmed, Deepak Chahar, Navdeep Saini#INDvSA
— BCCI (@BCCI) August 29, 2019
- ‘पराभवाच्या छायेत असल्यानेच राष्ट्रवादीला आली छ.शिवाजी महाराजांची आठवण’
- राफेल झाले, आता भारत – फ्रान्समध्ये होणार नवीन करार
- ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’, दानवेंची शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका
- ‘तरुणांच्या कपाळावरील बेरोजगारीचा शिक्का पुसून काढण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

